spot_img

Amravati : छोटे पप्पू यांना महाराष्ट्रातील लोकांवर भरवसा नाही का? : नवनीत राणा

नवनीत राणा यांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

Indiagroundreport वार्ताहर
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी आदित्य ठाकरेंना ‘छोटे पप्पू’ म्हणत टीका केली आहे. “छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेले होते. महाराष्ट्रातील लोकांवर यांचा भरवसा नाही का? महाराष्ट्राने आतापर्यंत दुसऱ्यांना प्रेरणा दिली, याचा विसर पडला का? राज्यातील नेत्यांनी कधीही दुसऱ्यांसमोर हात पसरला नाही,” असे त्या म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) हे एकदिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. तेव्हा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव(Tejashwi Yadav) यांची भेट घेतली होती. तेजस्वी यादव आणि मी एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करीत आहेत. त्यामुळे वातावरणीय बदल आणि पर्यावरण विषयावर चर्चा झाली, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या चिखलीतील सभेवरूनही नवनीत राणांनी हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) फक्त टीका करण्यासाठी सभा घेतात. ते म्हणतात रस्त्यावर उतरा, पण आपण कधी ‘मातोश्री’ सोडून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहात. शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाहीतर, तुम्ही अडीच वर्षात काय केलं, याच स्पष्टीकरण द्यायला हवे,” असेही नवनीत राणा यांनी म्हटले.

Explore our articles