
Indiagroundreport वार्ताहर
आंबरनाथ : (Ambernath) अंबरनाथमध्ये(Ambernath) बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना घडली आहे . या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सदर घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याीच घटना घडली. पनवेलमधील(Panvel) पंढरीशेठ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्यात वाद झाल्याने गोळीबाराची घटना घडली आहे. फडके गटाने पाटील गटावर अंधाधुंद गोळीबार केला आहे. अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. १५ ते २० गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गोळीबार झाल्याने येथील परिसरात एकच खळबळ उडाली. दोन गटात गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तर, राहुल पाटील(Rahul Patil) यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी पोहोचले.