
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (MUMBAI) सेंट्रल रेल्वेने(Central Railway) पायाभूत सुविधा मजबूत करणेकरिता अनेक पावले उचलली आहेत, तसेच ग्राहक आणि प्रवाशांच्या प्रवासी सोयी असो की, सुविधा किंवा नवीन लाईन, विद्युतीकरण किंवा दुहेरीकरण अशा विविध उपाययोजना राबविल्या आहेत.
एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आतापर्यंत, सेंट्रल रेल्वेने कोणत्याही वर्षातील १५८ किलोमीटर दुहेरीकरण, मल्टीट्रॅकिंगचा विक्रम पूर्ण केला आहे. १५८ किलोमीटरमध्ये नरखेड-कळंभा(Narkhed-Kalamba), जळगाव-सिरसोली, सिरसोली-माहेजी, माहेजी-पाचोरा ३री लाईन, भिगवण-वाशिंबे, अंकाई किल्ला-मनमाड, राजेवाडी-जेजुरी-दौंडज, काष्टी-बेलवंडी, वाल्हा-निरा, वर्धा-चितोडा दुसरी कॉर्ड लाईन यांचे दुहेरीकरण याचा समावेश आहे.
अनिल कुमार लाहोटी(सेंट्रल रेल्वेचे महाव्यवस्थापक) म्हणाले की, क्षमता वाढल्याने सेन्ट्रल रेल्वेला वाहतूककोंडीवर मात करण्यात मदत होईल आणि ट्रेन सुरळीत चालण्यास मदत होईल. संरक्षेवर तसेच प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित करून आम्ही रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्याचे आणि रेल्वेचे नेटवर्क भविष्याकरिता तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
वर्ष २०२१-२२ मध्ये, सेंट्रल रेल्वेने एकूण १७७.११ किमीची तत्कालीन सर्वोच्च पायाभूत सुविधा संवर्धन पूर्ण केले, ज्यात नवीन लाईन(३१ किमी), दुहेरीकरण (७४.७९ किमी), तिसरी/चौथी लाईन(५३.३२किमी) आणि ५वी/६वी मार्गिका(१८ किमी म्हणजे ९ किमीची प्रत्येक लाईन) समाविष्ट आहेत. तसेच, ३३९ रूट किमी (मार्ग किमी) चे विद्युतीकरण(electrification) पूर्ण करण्यात आले.