पुरुषौत्तम कनौजिया
नवी मुंबई : (Navi Mumbai) उरण(Uran) तालुक्यातील आवारे गावात राहणाऱ्या दोन मित्रांचा मंगळवारी रात्री उशिरा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
हे दोघेही नातेवाईकाच्या घरी गेले होते आणि परत येत असताना त्यांची कार पुष्पकनगर येथे एका दगडावर आदळल्याने कारचे नुकसान झाले आणि त्यात उपस्थित असलेल्या या दोघांचा मृत्यू झाला. अपघात झालेली कार अर्टिगा(Ertiga) ही त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती. ते लोक अनेकदा यातून फिरत असत.
मंगळवारी मोहिंदर गावंड आणि अलंकार पाटील हे नातेवाईकाच्या घरी गेले. नातेवाईकांना भेटून ते रात्री उशिरा तेथून परत येत होते. त्यांची कार पनवेलच्या(Panvel) पुष्पकनगर भागात येताच ती एका मोठ्या कठड्याला धडकली, त्यामुळे कार तिथेच पलटी झाली आणि त्यात प्रवास करणाऱ्या या दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला.
रस्त्याने जाणाऱ्यांनी अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह वाहनातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले. या दोघांची मैत्री(friendship) गावभर प्रसिद्ध होती.