
Mumbai: सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नाचा कम्युनिस्ट पक्षाकडून निषेध

राजा अदाटे
मुंबई: (Mumbai) राज्यातील शिवसेनेच्या काही आमदारांना ज्या पद्धतीने आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी या दोन्ही भाजप शासित राज्यांमधील शहरांमध्ये नेण्यात आले, त्या घटनेचा भारताचा कम्युनिस्ट पक्ष (Marxist)चा पॉलिट ब्युरो तीव्र निषेध केला आहे. हे काम या दोन्ही भाजप-शासित राज्यातील शासकीय यंत्रणांचा वापर करूनच केले गेले आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील संस्थांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या मंत्री आणि आमदारांना देखील लक्ष्य केले जात आहे.
पॉलिट ब्युरो ने म्हटले आहे की, भाजपाकडून अशा प्रकारे शासनयंत्रणेचा गैरवापर करणे नवीन नाही, राज्यातील परिस्थिती म्हणजे विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यातील सरकारे पाडण्यासाठी सातत्याने होत असलेल्या घटनाक्रमातील अजून एक पुढची घटना आहे.
माकप पॉलिट ब्युरो सर्व लोकशाहीवादी घटकांना आवाहन करीत आहे की, त्यांनी लोकशाहीला सुरुंग लावण्यासाठी केल्या गेलेल्या शासन यंत्रणेच्या गैरवापराच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी पुढे यावे.